Posts

अमर्त्य सेन ((नोबेल पारितोषीक विजेते )

Image
                                                                                                                                                                                                                                                 अमर्त्य सेन अमर्त्य सेन  ( बांग्ला : অমর্ত্য সেন ,  उच्चार - ओमोर्तो शेन ;  रोमन लिपी :  Amartya Sen ) (३ नोव्हेंबर, इ.स. १९३३ - हयात) ...

मराठीतील प्रसिद्ध कवि (माडगूळकर गजानन दिगंबर )

Image
माडगूळकर गजानन दिगंबर : (१ ऑक्टोबर १९१९–१४ डिसेंबर १९७७). विख्यात मराठी कवी व पटकथा–संवाद-लेखक. जन्म शेटेफळ ह्या गावचा. शिक्षण आटपाडी, कुंडल आणि औंध येथे. गणित विषयामुळे मॅट्रिकची परीक्षा उत्तीर्ण होऊ शकले नाहीत. पुढे घरच्या गरीबीमुळे चरितार्थासाठी चित्रपटव्यवसायात.त्यांच्या चित्रकथा वैविध्यपूर्ण असून त्यांचे संवाद सोपे पण प्रत्ययकारी आहेत. चित्रपटतंत्राची त्यांची अत्यंत सूक्ष्म जाण त्यांतून लक्षात येते. त्यांनी लिहिलेल्या आणि विशेष गाजलेल्या चित्रपटांत पुढचं पाऊल (पटकथा, संवाद, गीते १९५०), बाळा जो जो रे (१९५१), लाखाची गोष्ट (१९५२), पेडगावचे शहाणे (१९५२), ऊन पाऊस (१९५४), मी तुळस तुझ्या अंगणी (१९५५), जगाच्या पाठीवर (१९६०), संथ वाहते कृष्णामाई (१९६७) ह्यांचा समावेश होतो. (कथा, पटकथा, संवाद, गीते त्यांपैकी सर्व वा काही). तुफान और दिया (१९५६), दो आँखे बारह हाथ (१९५७), गूँज उठी शहनाई (१९५९) हे त्यांनी लिहिलेले उल्लेखनीय हिंदी चित्रपट. माडगूळकर हे उत्तम चरित्र अभिनेतेही होते. पुढचं पाऊल, लाखाची गोष्ट, पेडगावचे शहाणे, वऱ्हाडी आणि वाजंत्री (१९७३) ह्या चित्रपटांत त्यांनी केलेल्या भूमिका संस्मरण...

मराठीतील प्रसिद्ध कवी (कवी मंगेश पाडगावकर)

Image
  मंगेश पाडगावकर यांचा जन्म १० मार्च १९२९ रोजी वेंगुर्ले येथे झाला. मराठी आणि संस्कृत विषय घेऊन ‘एम.ए’ झालेल्या पाडगावकर यांनी दोन वर्षे महाविद्यालयात अध्यापक म्हणूनही काम केले. १९५३ ते १९५५ ही दोन वर्षे पाडगावकर यांनी ‘साधना’ साप्ताहिकात सहसंपादक म्हणून काम केले. मुंबई आकाशवाणीवर १९६४ ते १९७० या कालावधीत निर्माता म्हणूनही त्यांनी काम केले. युनायटेड स्टेट्स इन्फर्मेशन सर्व्हिस-युसीस येथे मराठी विभागाचे प्रमुख संपादक म्हणून काही वर्षे काम केल्यानंतर १९८९ मध्ये ते निवृत्त झाले. ६० आणि ७० च्या दशकात पाडगावकर, ‘ज्ञानपीठ’ विजेते कवी विंदा करंदीकर आणि कवी वसंत बापट यांचे एकत्रित काव्यवाचनाचे कार्यक्रम राज्यात अनेक ठिकाणी झाले. पाडगावकर यांनी लिहिलेली ‘या जन्मावर, या जगण्यावर शतदा प्रेम करावे’, ‘भातुकलीच्या खेळामधली’, ‘शुक्रतारा मंद वारा’ ही गाणीही खूप गाजली. प्रेम म्हणजे प्रेम असतं, तुमचं आमचं अगदी ‘सेम’ असतं, ही त्यांची कविताही विशेष गाजली होती. दुबईमध्ये झालेल्या दुसर्‍या विश्व मराठी साहित्य संमेलनाचे पाडगावकर अध्यक्ष होते. उतारवयातही त्यांनी अनेक कार्यक्रमांमधून आपल्या कविता सादर करून...

मराठीतील प्रसिद्ध कवी (विष्णू वामन शिरवाडकर, कुसुमाग्रज)

Image
  विष्णू वामन शिरवाडकर तथा तात्यासाहेब शिरवाडकर (२७ फेब्रुवारी १९१२ - १० मार्च १९९९) हे मराठी भाषेतील अग्रगण्य कवी, लेखक, नाटककार, कथाकार व समीक्षक होते. त्यांनी कुसुमाग्रज या टोपणनावाने कवितालेखन केले. ते आत्मनिष्ठ व समाजनिष्ठ जाणीव असणारे मराठीतले महत्त्वाचे लेखक मानले जातात. शिरवाडकरांचे वर्णन सरस्वतीच्या मंदिरातील दैदीप्यमान रत्‍न असे करतात. वि.स. खांडेकर यांच्यानंतर मराठी साहित्यात ज्ञानपीठ पुरस्कार मिळवणारे ते दुसरे साहित्यिक होते. त्यांचा जन्म दिवस (२७ फेब्रुवारी) हा मराठी भाषा गौरव दिन साजरा केला जातो. ( अनेक वेळा सर्व सामान्य माणसा कडून 'मराठी भाषा गौरव दिन' आणि 'मराठी भाषा दिवस' याची गफलत केली जाते. 'मराठी भाषा गौरव दिवस' (२७ फेब्रुवारी) आणि 'मराठी राजभाषा दिवस' (१ मे) हे स्वतंत्र दिवस असून या दिवसाचे स्वतंत्र असे महत्त्व आहे. १ मे रोजी मराठी राजभाषा दिवस साजरा केला जातो.) कुसुमाग्रज हे मराठी अभिरुचीवर चार दशकांपेक्षा अधिक काळ प्रभाव गाजविणारे श्रेष्ठ प्रतिभावंत कवी, नाटककार, कथाकार, कादंबरीकार, लघुनिबंधकार व आस्वादक समीक्षक होते. प्रामाणिक साम...

नदी प्रदूषण: कारणे व परिणाम

Image
  "नदी प्रदूषण: कारणे  व परिणाम" समृद्ध सांस्कृतिक वारसा आणि वैविध्यपूर्ण लँडस्केपसाठी ओळखला जाणारा भारत, एक महत्त्वपूर्ण पर्यावरणीय आव्हानाचाही सामना करत आहे: नद्यांचे प्रदूषण. भारतीय संस्कृतीत पवित्र आणि पूजनीय मानल्या जाणाऱ्या नद्या औद्योगिक कचरा, शेतीतील वाहून जाणारे पाणी आणि अयोग्य कचरा व्यवस्थापन पद्धतींमुळे गंभीर ऱ्हासाला सामोरे जात आहेत. या ब्लॉग पोस्टमध्ये, आपण भारतातील नदी प्रदूषणाची कारणे आणि परिणामांचा शोध घेऊ आणि संभाव्य उपाय शोधू जे या जीवनरेषांचे आरोग्य पुनर्संचयित करण्यात नेहमी मदत करू शकतात. नदी प्रदूषणाची कारणे 1) औद्योगिक कचरा भारताच्या आर्थिक वाढीमध्ये उद्योगांची महत्त्वाची भूमिका आहे , परंतु प्रक्रिया न केलेल्या सांडपाण्यांचे नद्यांमध्ये अनियंत्रित विसर्ग केल्याने घातक परिणाम झाले आहेत .   उद्योगांमधील जड धातू , रसायने आणि प्रदूषक जलस्रोतांना दूषित करतात , ते मानवी वापरासाठी अयोग्य ठरतात आणि जलचर पर्यावरणास हानी पोहोचवतात . 2) कृषी प्रदूषण खते आणि कीटकनाशकांच्या अतिवापरासह सघन कृषी पद्धती , नदी ...